निरोप कसला माझा घेतां
जेथें राघव तेथें सीता
ज्या मार्गी हे चरण चालती
त्या मार्गी मी त्यांच्या पुढती
वनवासाची मला न भीति
संगे आपण भाग्यविधाता!
संगे असता नाथा, आपण
प्रासादाहुन प्रसन्न कानन
शिळेस म्हणतिल जन सिंहासन
रघुकुलशेखर वरी बैसतां
वनीं श्वापदें, क्रूर निशाचर
भय न तयांसें मजसी तिळभर
पुढती मागें दोन धनुर्धर
चाप त्यां करीं, पाठिस भाता
ज्या चरणांच्या लाभासाठीं
दडलें होतें धरणीपोटी
त्या चरणांचा विरह शेवटीं
काय दिव्य हें मला सांगतां?
कोणासाठीं सदनीं राहूं?
कां विरहाच्या उन्हांत न्हाऊ?
कां भरतावर छत्रे पाहूं?
दास्य करूं कां कारण नसतां?
कां कैकयि वर मिळवा तिसरा?
कां अपुल्याही मनीं मंथरा?
कां छळितां मग वृथा अंतरा?
एकटीस मज कां हो त्यजितां?
विजनवास या आहे दैवीं
ठाउक होते मला शैशवीं
सुखदुःखांकित जन्म मानवी
दुःख सुखावेंप्रीती लाभतां
तोडा आपण; मी न तोडितें
शात जन्मांचे अपुलें नातें
वनवासासी मीही येतें
जाया-पति कां दोन मानितां?
पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचे अखंड पूजन
हें आर्यांचे नारीजीवन
अंतराय कां त्यांत आणिंता?
Monday, July 9, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment